मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकित 42.4 अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान 33 ते 42 अंशाच्या दरम्यान राज्यात जोरदार वारे वाळत असून ढगाळ हवामान होतं कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भातील अमरावती ब्रह्मपुरी चंद्रपूर वर्धा येथे उष्णतेची लाट आहे.
वायव्य मध्य प्रदेश ईशान्य राजस्थानमध्ये कमी दाबाच्या क्षेत्र सक्रिय सिक्कीम पासून झारखंड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला समुद्रसपाटीपासून 900 मीटर ते पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्राकारवरांची स्थिती त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
केरळच्या किनाऱ्यालगत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला विदर्भातील उष्ण लाटाच कायम राहण्याची शक्यता आहे तर तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कोणतीही प्रगती केली नाही पण शुक्रवार पर्यंत दक्षिणद्वीपकल्पाचा आणखी काही भाग पश्चिम बंगाल झारखंड बिहारचा आणखी काही भाग तसेच ओडिषा आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता असा अंदाज हवामान विभागाने दिल्या.