
सर्व मोबाईल धारकांसाठी म्हणजेच मोबाईल वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे ट्रायने एक दिलासादायक व महत्त्वाची बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत.
मित्रांनो आपण प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोनचा वापर करतो मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक कामे कुठेही न जाता घरबसल्या सहज शक्य असल्याने स्मार्टफोनचे महत्त्व अलीकडच्या काळात अधिकच वाढले आहे मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकेसंबंधी कामे पैशांची देवाणघेवाण, ऑनलाईन व्यवहार, व शॉपिंग पासून ते खरेदी विक्री, वीज बिल भरणे, पाणी बिल भरणे, तिकीट बुकिंग करणे याशिवाय जेवण ऑर्डर करणे, किंवा इतर कोणतीही महत्त्वाची कामे असतील तर सर्वच जण मोबाईल फोनचा वापर करतात.