आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ” हर घर तिरंगा २०२५” मोहिमेबाबत azadi ka amrut mahotsav har ghar tiranga mohim
संदर्भ : मा. उपसचिव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र दि. ३१ जुलै, २०२५
हर घर उपरोक्त संदर्भ विषयी सूचित करण्यात येते की, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा ” मोहीम सुरु करण्यात आली होती जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यसाठी प्रोत्साहित करणे आहे. या वर्षी हर घर तिरंगा मोहीम २ ते १५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत खालील तीन टप्प्यात आयोजित करवयाचे आहे.
सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोहिमेदरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि www.harghartiranga.com या वेबसाईटवर तिरंग्यासोबतची सेल्फी अपलोड करण्यसाठी प्रोत्साहित करावे. भारतच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळामध्ये ध्वजारोहण आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. भारताचे राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करताना ध्वज संहिता २००२ (https://www.mha.gov.in/sites/default/files/flagcodeofindia070214.pd f) चे पालन करावे. यासाठी तिरांग्यासोबत सेल्फी, प्रभातफेरी, तिरंगा रॅली (बाईक आणि सायकल रॅलीसह) तिरंगा प्रदर्शन, तसेच इतर समाज सहभाग घेण्यात यावा. सदर मोहिमेअंतर्गत हाती घेतलेले उपक्रम विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पाठवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल eel.section-edu@gov.in आणि socialsciencedept@maa.ac.in या ईमेलवर पाठवावा. सर्व विदयार्थी, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा आणि समाजाच्या सक्रिय सहभागामुळे हर घर तिरंगा २०२५ मोहीम आपल्या देशातील प्रत्येक भागात पोहोचेल, ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल. यासाठी