15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन सोपे मराठी भाषण indian independence day marathi speech

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन सोपे मराठी भाषण indian independence day marathi speech

उत्सव तीन रंगांचा

आकाशी आज सजला

नतमस्तक त्या सर्वांना

ज्यांनी भारत देश घडवला

सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.

त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *