१५० दिवसांचा कार्यक्रमांतर्गत E-office संदर्भात मार्गदर्शन सुचना eoffice one hundred fifty days karyakram
वाचा :-
सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१७२५/प्र.क्र.१२६/मा.तं, दिनांक ३० मे, २०२५.
प्रस्तावना :-
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत भारत २०४७ (India २०४७)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यांस अनुसरून नियोजन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार राज्याच्या एकत्रित १५० दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विकसित महाराष्ट्र-२०४७ Vision Document तयार करण्यात येत आहे. सदर प्रकरणी राज्यामध्ये १५० दिवसांच्या कार्यक्रमाचे (दि.०६.०५.२०२५ ते दि.०२.१०.२०२५) यशस्वी नियोजन करून प्रभावीपणे राबविण्याबाबतच्या सूचना मा. मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या दि.२०.०६.२०२५ रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत.
त्यानुषंगाने १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याची देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
१५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व मंत्रालयीन कार्यासने तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालये (सर्व राज्यस्तरीय कार्यालये, विभागीय क्षेत्रिय कार्यालये तसेच जिल्हास्तरावरील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये) शासकीय कामकाजात यापुढे ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात यावा. तसेच, पत्रव्यवहार देखील ई-ऑफिसव्दारे करण्यात यावे. त्याअनुषंगाने ई-ऑफिस प्रणाली राबविण्याकरीता खालील प्रमाणे मुदत निश्चित करण्यात येत आहे.